Sunday, February 14, 2021
Friday, February 12, 2021
छत्रपती शिवाजी महाराज | शिवजयंती निमित्त संपूर्ण माहिती | १९ फेब्रुवारी
🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩
पूर्ण नाव : शिवाजी शहाजी भोसले.
बालपण : शिवरायांची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. त्यांची आई त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे: तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत. जिजाबाई व शिवराय यांना शहाजीराजांनी बंगळूरास नेले. तिथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे याचे शिक्षण घेऊन ते तरबेज झाले. पुण्याला आल्यानंतर दादाजींनी त्यांना घोडदौड. तिरंदाजी, कुस्ती खेळणे तसेच लोकांना आपलेसे करणे, न्याय देणे. या गोष्टीही शिकविल्या. वयांच्या चौदाव्या वर्षी फलटणच्या नाईक-निंबाळकरांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा विवाह लाल महालात संपन्न झाला.
कार्य : १६४५ मध्ये त्यांनी आपल्या सर्वगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य । ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य । या विचारांनी त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधावयाचे, असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले. शिवरायांचा बंदोबस्तासाठी आदिलशहाने अफजलखानाला
पाठविले. अफझलखान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरविले व त्या भेटीत त्यांनी अफजलखानाचा वध केला. या वधामुळे चिडून आदिलशहाने सिदी जौहरला शिवरायांशी लढण्यास पाठविले. त्याने राजांना पन्हाळगडात कोंडले; परंतु छत्रपती शिवराय तेथूनही निसटले. या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. त्यानंतर लाल महालात कपटाने आलेल्या शायिस्तेखानाची बोटे कापून त्याची फजिती केली; तो दिवस होता, ५ एप्रिल १६६३. पुरंदरच्या तहानंतर ते औरंगजेबास भेटण्या- साठी आगऱ्याला गेले परंतु बादशहाने त्यांना नजरकैद केले. तेव्हा राजे युक्तीने पेटान्यातून १६६६ मध्ये पसार झाले.
मुघलांच्या ताब्यातील कोंढाणा हा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा, असे जिजाबाईसह शिवरायांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरेना पाठविले; परंतु लढता लढता तानाजी मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले व नंतर तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.
स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. काशीपंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधुसंत, मातापिता या सर्वांचा आदर कैला, फितुरांना कडक शासन केले. 'सजन्नांना राखावे. दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्मांचा आदर करत.
शिवरायांचे रूप : आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतशः प्रणाम !
मृत्यू : अशा या थोर राजाचा मृत्यू १६८० मध्ये झाला.
Thursday, February 11, 2021
Animals Around us | All Questions and Answers | Environmental studies | Standard One
Animals Around us
Environmental studies
Standard One
Q.1) Draw a line Across the wrong word :
Q.2) Fill in the blanks with suitable words from the brackets :
( grass, insects, long, horns, wild )
Q.3) Underline the wrong word in the sentence and write the correct word :
Q.4) Answer in single sentence:
Q.5) Who am I ?
Q.6) Write 'Yes' or 'No' for each sentence :
Q.7) Write what are they :
Q.8) Match the following and write the answers from group 'B' :
Sr.No | Group ‘A’ | Answers | Group ‘B’ |
1 | Reptile | ---------------------- | a) peacock |
2 | Water creature | ----------------------- | b) deer |
3 | Water and land creature | ----------------------- | c) lizard |
4 | Bird | ----------------------- | d) tortoise |
5 | Animal | ----------------------- | e) fish |
Q.9) Circle only the domestic animals from the list given below :
Lion | Cow | Frog | Tiger | Goat |
Buffalo | Giraffe | Cockroach | Hen | Snake |
Zebra | Sheep | Monkey | Elephant | Horse |
Q.10) Look at picture of domestic animals and write their names below :
Tuesday, February 2, 2021
शब्दसिद्धी ( शब्द तयार करणे ) | मराठी व्याकरण | उपसर्ग | प्रत्यय
शब्दसिद्धी ( शब्द तयार करणे )
मराठी व्याकरण
अक्षर किंवा शब्द जोडल्यामुळे वेगवेगळे नवीन
शब्द तयार होतात , त्याला शब्दसिद्धी
( सिद्ध होणे म्हणजे तयार होणे ) म्हणतात.
💥स्वाध्याय💥
Friday, January 29, 2021
शब्द | मराठी व्याकरण
!!शब्द !!
योग्य क्रमाने अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
👉खालील अक्षरसमूह नीट वाचा व समजून घ्या :
१) ई + मा = ईमा ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही.
२) बा +आ = बाआ ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
३) व +ळा +का = वळाका ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
४) गा +ल+मु = गालमु ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
५) इ +म+स = इमस ➝ या शब्दाला काहीच अर्थ नाही .
👉आता खालील शब्द नीट वाचा व समजून घ्या:
१) मा + ई = माई ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
२) आ +बा = आबा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
३) का +व +ळा = कावळा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
४) मु+ल+गा = मुलगा ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
५) इ +स+म = इसम ➝ हा अर्थपूर्ण शब्द आहे.
अशा प्रकारे योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द तयार होतो; म्हणून 'माई, आबा, कावळा, मुलगा, इसम ' हे अर्थपूर्ण शब्द आहेत.
----------------------------------------------------------------
💥दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द💥
घर ढग सन मन बस वर पळ
धर उठ चल गळ सण भर नळ
💥तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द💥
अजय गवत मदत मनन नमन
शरद वरण गरम बदक कमळ
Most Important Contraction List
Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...

-
इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ? कोणतीही भाषा शिकताना वा कोणतेही ज्ञान संपादन करताना प्रश्नांना विशेष महत्व असते. तुम्ही...
-
पाठ २४. थोर हुतात्मे संपूर्ण प्रश्नोत्तरे -------------------------- प्र.१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा : १) लाहोरच्या तुरुंगातले तीन ...